सच्चिदानंद नगरातील पुलाचे सिमेंट नाल्याचे बांधकाम अधुरे !…नाल्या नजिकच्या नागरिकांना मच्छरांचा भयंकर त्रास :
नागपूर : दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोडवरील सचिदानंद नगरातील व लाडेकर ले -आउट यांच्या जोडावर असलेल्या पुलाच्या नाल्याचे बांधकाम काही ठिकाणी होऊन, काही काम अचानक थांबविल्या गेलेले आहे. सच्चिदानंद नगर व लाडीकर ले आउटच्या जोडावरील लोकांची कोंडी होत पुलाचे बांधकाम ठप्पच आहेत. येण्याऱ्या -जाणाऱ्यां नागरिकांची गैरसोय होत आहे.
तसेच या नाल्यांमधील पूर्वीपासून साचलेले घाण पाण्याचा खूपचं दुर्गंध परसत आहे. त्यात किडे, माकोडे, कचरा, काडी पडलेला आहे. घाण पाण्याचा दुर्गंध सुद्धा येतोय आणि वरून पावसाने थैमान घातले असून वादळी पावसामुळे पाणी पुन्हा त्याच्यात साचलेले आहेत आणि त्या पाण्याची खूपच दुर्गंधी पसरलेली असून तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अर्धवट नाल्याच्या बांधकामापासून नागरिकांना मच्छरांचा खूपच त्रास होत आहे. अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
दुसरी गोष्ट नाल्याला कठाळे लावून रस्ता बंद करून सावधान काम चालू आहे ? असे बोर्ड लावले ! याचा अर्थ काय ? कित्येक दिवसापासून काम ठप्प पडले असून अधुरंच काम केले आहे. या पुलाच्या बांधकामामुळे वस्तीतील नागरिकांनी मनपालाच दोषी ठरविले आहे. नाल्याचे पूर्णपणे बांधकाम तातडीने करावे. अशी नम्र विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. अन्यथा सच्चिदानगर व लाडेकर ले -आउट येथील रहिवाशांनी मनपाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. कारण मागील दोन वर्षांपासून प्रभागात नगरसेवक नाहीत तर आमच्या लोकांचं कोण ऐकणार ? हा प्रश्न लोकांसमोर पडलेला आहे ? तरी सुद्धा मनपाचे राज्य असून मनपा निष्काळजीपणा करित आहे. असा चक्क आरोप नागरिकांनी लावला आहे.