हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

मोर्चे ,जाळपोळ आणि दंगली करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ,” मराठा आरक्षण ,” मिळणार नाही. शांतता आणि विधायक मार्गाने मराठा आरक्षण मिळणार.पत्रकार गडलिंग 

spot_img

🔴 LIVE TV 🔴

मोर्चे ,जाळपोळ आणि दंगली करून कोणत्याही परिस्थितीमध्ये ,” मराठा आरक्षण ,” मिळणार नाही. शांतता आणि विधायक मार्गाने मराठा आरक्षण मिळणार.पत्रकार गडलिंग 
भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती केल्याशिवाय ,” मराठा आरक्षण मिळणे अशक्य……..!!
________________________________
..राजाभाऊ गडलिंग
( मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ),

…..केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेत केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे , मराठा आरक्षणात अडचण निर्माण झाली असून ,मराठा आरक्षणाचा अडचण ठरणाऱ्या संविधानाची
. परिच्छेद 342(A) उपखंड 366,26. (क) तरतुदी वगळण्यासाठी किंवा घटनेत दुरुस्ती करून केंद्र सरकारने तसा ” विशेष अध्यादेश ” काढला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल….!!!!”


“……. आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी मागणी अलीकडे काही मराठा संघटनांनी आणि काही महत्त्वपूर्ण मराठा समाजातील काही राजकारणी मंडळीनी नुकतीच केली आहे .त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयामध्ये सुद्धा मराठा समाजाचा समावेश करावा. याबद्दलही अनेकांनी आपले मत मांडले आहे. मात्र भारतीय राज्यघटनेत आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मुळीच तरतुद नाही . नरसिंहराव सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांचा जो उपवर्ग निर्माण केला होता तो सर्वोच्च न्यायालयाच्या ” इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार ” या केसच्या निकालात ९ न्यायाधिशांच्या घटनापीठाने दि . १६ नोवर १ ९९ २ रोजी अशा प्रकारचे आरक्षण रद्द केले आहे . तत्कालीन भारताचे पंतप्रधान पी.व्ही . नरसिंहराव यांनी सन १ ९९ १ मध्ये सवामधील घटकांना १० % आरक्षण दिले होते . मात्र निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविला आहे .


…….. भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारातील कलम १६ ( ४ ) नुसार मूलत : आरक्षण देण्यात आले असून ,राज्यघटनेच्या कलम ३४० नुसार स्थापन झालेल्या मंडळ आयोगाने इतर मागासवर्गीय ( ओबीसी ) यांना आरक्षण दिले आहे . कलम १६ ( ४ ) व मंडल आयोगाने केलेल्या शिफारशींमध्ये मराठा समाजाचे आरक्षण या तरतुदी मध्ये बसत नसल्याचा निर्वाळा व न्याय प्रक्रिया मध्ये निर्णय दिला आहेत . त्यामुळे राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करून मराठा आरक्षण देण्यासाठी केन्द्र सरकारने पुढाकार घ्यावा . त्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे दुरपास्त आहे .सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत असे आहे की 50% च्यावर भारतामध्ये आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे मराठा समाजाची जी मागणी आरक्षणाची आहे ती सर्वोच्च न्यायालय मध्ये टिकणे अतिशय कठीण आहे.वास्तविकरित्या मराठा समाजाला चुकीच्या मार्गाने अडचणीत न आणता भारतीय संसदेत मराठा आरक्षण मजुर करून घेण्यासाठी कायदेशिर मागांचा अवलंब करावा , असे माझे मत आहे .

आर्थिक निकषावर समकालीन आरक्षण सर्वांसाठी असावे असे मत काही राजकारणी मंडळींनी आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केले असले तरी, आर्थिक निकषापर दिलेले आरक्षण हे व्यक्ति केंद्रीत होणार असून घटना दुरुस्ती करूनही तसे आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही .वास्तविकरित्या ” भारतीय संविधानामध्ये ” संविधानकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेत आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही . त्यामुळे राजकारणी लोकांनी आर्थिक आरक्षणाची मागणी न करता ” मराठा आरक्षणाचा ” प्रश्न भारतीय संविधान , सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात राहुनच सोडविला पाहिजे , मंडल आयोगाने देशातल्या ५२ %टके इतर मागासवर्गीय शैक्षणिक व सेवा क्षेत्रात २७ % आरक्षण दिले . इंदिरा सहानी व इतरांनी त्याला सर्वोच न्यायालयात आवाहान दिले होते , १६ नोव्हेंबर १ ९९ २ रोजी सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणावर शिक्कामोर्तब करताना केंद्र व राज्य सरकारांनी या संदर्भात कायमस्वरूपी घटनात्मक आयोगाची स्थापना करावयाचा आदेश दिला होता .

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून १५ मार्च १ ९९ ३ रोजी महाराष्ट्र शासनाने ” स्थायी समितीची नियुक्ती केली होती . नंतर या समितीची नामकरण दिनांक १५ मे १ ९९ ५ पासून ” राज्य मागासवर्ग आयोग ” असे करण्यात आले आहे . सदर आयोग हा अनु . जाती व जमाती वगळून इतर मागासवर्ग आणि प्रवर्ग यांच्यासाठी काम करतो . सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र . ४ अन्वये या आयोगाने कामकाज चालविल्या जाते . या आयोगामध्ये मराठा समाजासाठी कोणत्याही आरक्षणाची तरतुद व शिफारस नसतांनाही राज्य सरकार आयोगाच्या पाठीमागे लागून विनाकारण वेळ खर्ची घालत आहेत. विनाकारण माझ्या मते मराठा आरक्षण लांबवीत आहे . मराठा समाजाचा ओ.बी.सी. मध्ये समावेश करावयाच्या मागणीचा न्या . बापट आयोगाने सलग चार वर्षे सखोल अभ्यास केला . बहुमतांनी त्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात मराठा समाज हा ओ.बी.सी.(OBC) साठी असलेल्याl निकषांमध्ये बसत नसल्याने त्यांचा ओ.बी.सी. मध्ये समावेश करायला दिनांक २३.08. २००४ रोजी आयोग पुरचना करण्यात आली . त्या दरम्यान या आयोगाचे अध्यक्ष न्या . बापट यांनी स्पष्टपणे मराठा आरक्षणाला नकार दिला आहे .

………तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाने शिफारस केल्याशिवाय राज्य सरकारला कोणत्याही जातीला ओ.बी.सी. मध्ये समाविष्ट करण्याचे अधिकार नाहीत , असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे . २५ जुलै २००८ रोजी , न्या . बापट आयोगाने आपला ऐतिहासिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करून आयोगाने स्पष्ट बहुमताने मराठ्यांना ओ.बी.सी. मध्ये समावित करायला नकार दिला आहे . प्रत्यक्षात अहवाल शास्त्रीय आणि संवैधानिक कसोट्यांवर आधारीत असून मंडळ आयोगाने आणि त्या आधीच्या काकासाहेब कालेलकर आयोगाने सुद्धा सामाजिक ,आर्थिक व शैक्षणिक असे शास्त्रीय निकष लावून इतर मागासवर्गीयांची यादी तयार केली आहे . त्यात कुणबी असून मराठ्यांना मात्र ओ.बी.मी. मध्ये स्थान नाही . परंतु राजकीय समीकरणासाठी राजकीय नेते मात्र ” मराठा व कुणबी ” एक आहेत असे सांगतात हे अत्यंत चुकीचे आहे . तसेच कुणबी आणि मराठा एक नाहीत असा स्पष्ट निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला असून ,त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिकामोर्तब केले आहे . जगन्नाथ होले विरुद्ध महाराष्ट्र सरकार ( रिट पिटिशन क :- 4476/2002)
या केसच्या दि . १७ ऑक्टोबर -2003 च्या निकालपत्रात हायकोर्टाच्या औरंगाबाद घटनापीठाने ” मराठा व कुणबी ” हे एकच आहे असे मानायला स्पष्टपणे नकार दिला आहे . त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १५ एप्रिल २००५ रोजी शिकामोर्तब केले आहे . घटनात्मक तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतचे विविध संवैधानिक न्यायालयीन निकाल आणि राज्य व केंद्रीय मागासवर्ग आयोगांचे निर्णय या ( सर्वोच्च न्यायालय घटकांनी ) मराठा समाजाचे “.ओबीसीकरण ” अमान्य केले आहे . महाराष्ट्र राज्यात ओ.बी.सी.चे आरक्षण – 1967 पासून सुरू आहे . मात्र आताच मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी पुढे येण्याचे कारणही राजकीय असू शकते .

भारतीय संविधान कलम-73,74 च्या घटना दुरुस्तीने ग्रामपंचायत समित्या जिल्हा परिषदा , मनपा , नगरपालिका आणि नगर पंचायती मध्ये ओबीसींना २७ % आरक्षण देण्यात आले आहे . मात्र मराठा समाजवर्णव्यवस्थेत छत्रिय मानला जातो . राष्ट्रकूट,कदंब , शिलाहार , अशा राजघराण्यातून आलेल्या मराठा समाजाचे या महाराष्ट्रासह अनेक मराठे नेतृत्व दिलेले असताना त्यांनी केवळ सत्तेची मोठमोठे पदे पदरी बाळगून गावगाड्यातील गरीब मराठा जनतेला पूर्णत : दूर्लक्ष केलेले आहे . भारतीय संविधानाची निर्मिती सुरू आणतांना घटना परिषदेत अनेक मराठा नेते असुनही घटना तयार करतांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी कोणत्याही राजकीय पुढा-यांनी केलेली नव्हती . सन -1967 पासून आलेल्या ओ.बी.सी. प्रवर्गाच्या शैक्षणिक व सेवाविषयक आरक्षणातही आजपर्यंत ही वाटा मागितला गेला नाही . त्यामुळे सध्याची ” मराठा आरक्षणाची मागणी ही केवळ राजकीय हेतूने राजकीय पुढारी यांच्याकडून केली जात असल्याचा ओ.बी.सी.चा आरोप आहे . उच्च वर्गामधे निश्चितच अनेक जाती अशा आहेत की , ज्यात गरीबांचे प्रमाण मोठे आहे .

अशा मराठ्यांमधील उच्चवर्णीय नागरिकांच्या शैक्षणिक ,आर्थिक उत्थानासाठी संविधाननिर्मात्यांनी भारतीय राज्य घटनेतील कलम ३८,३ ९ , ४१ ब 46 नुसार शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या अनेक योजना अंमलात आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने राज्य व केन्द्र सरकारवर टाकलेली आहे . मात्र आजपर्यंत प्रामुख्याने महाराष्ट्रात सर्वाधिक मराठा मुख्यमंत्री अधिकारावर असतांना त्यांनी सुद्धा ‘ मराठा ‘ यांच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कोणताही ठोस कार्यक्रम हाती घेतलेला नाही . ही वस्तुस्थिती आहे .
…….. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अधिनियम २००५ अन्वये चालते . या कायद्यानुसार आयोगाल्i ” दिवाणी न्यायालयाचे अधिकार ” देण्यात आले आहेत . या आयोगाने दिलेला सल्ला किंवा केलेली शिफारस राज्य शासनावर बंधनकारक असते . परंतु राज्य शासन या आयोगाच्या शिफारसीकडे जाणून बुजून डोळेझाक करतात आणि या आयोगाचे जे काही अहवाल निर्मित असतात ते अनेक वर्ष प्रलंबित तसेच मंत्रालय स्तरावर धूळखात पडलेले असतात. त्यामुळे आयोगाने निर्णय महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून तसेच प्रलंबीत पडलेले आहेत . कालेलकर आयोग आणि मंडल आयोगाने ” मराठा समाजाला ” ओबीसीचे आरक्षण स्पष्टपणे नाकारले .एवढेच नाही तर त्यानंतर आलेल्या मुंटाठकर समिती , न्या . खत्रीआयोग , केन्द्रीय मागासवर्ग आयोग , आणि न्या . बापट आयोग या सर्वांनीच मराठा समाजाचा ओ.बी.सी. सुचित टाकायला स्पष्ट नकार दिला आहे .

तामिळनाडू 69% आरक्षणपॅटर्न:-
—————————————
….. वास्तविकपणे भारतात फक्त तामिळनाडू हे एकच राज्य आहे की, या राज्यात 69% आरक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेत घटना दुरुस्ती करून 9 नव्या अनुसूचित तयार करून हे आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षणात वाढ करण्यासाठी राज्यघटनेतील अनुच्छेद- 16 (4) च्या आधारावर आरक्षण कायदा करण्यात येऊ शकतो. त्यासाठी मराठा नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव गट वापरून तो करून घ्यावा लागेल .हा अधिकार संसदेला असून,( 9 व्या परिशिष्टात )हा विषय टाकण्यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे. आणि त्याला विशेष बहुमताची गरज सुद्धा लागते.वास्तविकपणे तामिळनाडूच्या सर्व संसद सदस्यांनी एकमुखी आग्रह धरून, राज्य सरकारच्या कायद्याला भारतीय संविधानाची घटना दुरुस्ती करून( 9व्या परिशिष्टात तरतूद करून घेतली आहे )सन- 1993 श्रीमती. जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी 69% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेऊन राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारवर दबाव गट वापरून घटनेच्या 9 नवव्या परिशिष्टात मध्ये त्याची तरतूद करायला केंद्र सरकारला भाग पाडले.

…… त्यामुळे तामिळनाडूच्या 69% आरक्षणाला भारतीय राज्यघटनेचे सुद्धा संरक्षण कवच मिळाले आहे. परंतु भारतीय संविधानाच्या 9 नव्या परिशिष्टi मध्ये आरक्षणाची तरतूद केल्याने 10 दहा वर्षात याचा फेरआढावा सुद्धा घेतला जाऊ शकत नाही .ही वस्तुस्थिती आहे .परंतु तामिळनाडूच्या आरक्षणाची सन 2004 मध्ये या तरतुदीची वैधता संपली आहे .हे आरक्षणाचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय राखून ठेवलेला आहे.
……. सन १ ९९ ५ ते २००८ या कालावधीत ” मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर आलेल्या सर्वच आयोगांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे . मराठा विषयक सात नकारार्थी अहवाल महाराष्ट्र शासनाकडे आलेत , तरीही महाराष्ट्र सरकार पुन्हा या विषयाला घेवून ” राज्य मागासवर्ग आयोगाकडे जाणार म्हणजे पुन्हा मराठा आरक्षण कायमचे झुलवत व प्रलंबित ठेवणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे . हा निष्कर्ष यातून स्पष्ट होत आहे . घटनेच्या कलम ३४० अन्वये ओ.बी.सी. पाहणी करण्यासाठी प्रथम १ ९ ५३ मध्ये ” काकासाहेब कालेलकर ” यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगाने अहवालात राज्यवार इतर मागास जातींची यादी दिली आहे . मुंबई राज्याच्या यादीत ३६० इतर मागास जाती आहेत . त्यात क्र . २०६ वर कुणबी आहेत मात्र या यादीत ” मराठा ” जात कुठेही उल्लेख दिसत नाही . वास्तविकपणे भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४०-16(4) ,१५ ( ४ ) , १५ ( ४ ) , १५ ( ५ ) अन्वये घटनेने मिळणारे आरक्षण फक्त ज्या मागासवर्गीय समाज घटकांना पुरेशे कोणत्याही क्षेत्रात प्रतिनिधित्व नसते अशाच समाज घटकांना देण्याचे प्रावधान आहे . त्यामुळे या कलमांद्वारे मराठा समाजाला आरक्षण मागीतले जात आहे , परंतु ” मराठा आरक्षण. ” देण्याचे घटनेत कोणतीही तरतुद नसल्याने या कलमांद्वारे ” मराठा आरक्षण ” द्यायचे असले तर केवळ राज्य मागासवर्ग आयोगांवरच अवलंबून न राहता भारतीय संविधानात यासाठी घटना दुरुस्ती करणे गरजेचे आहे . त्यासाठी भारतीय संसद मध्ये ” मराठा आरक्षण ” चर्चेस येणे महत्वाचे आहे .

केंद्र सरकारने भारतीय राज्यघटनेत केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे , मराठा आरक्षणात अडचण निर्माण झाली असून ,मराठा आरक्षणाचा अडचण ठरणाऱ्या संविधानाची
. परिच्छेद 342(A) उपखंड 366,26. (क) तरतुदी वगळण्यासाठी किंवा घटनेत दुरुस्ती करून केंद्र सरकारने तसा ” विशेष अध्यादेश ” काढला तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल.
….. केंद्र सरकारने सन 2017 मध्ये केलेल्या 102 व्या घटना दुरुस्तीतील परिच्छेद 342 (A) व उपखंड 366 (26)- क तरतुदीमध्ये राज्य सरकारच्या अधिकारात ही अडचण येत असल्यामुळे ,संबंधित राज्य सरकार ” सुप्रीम कोर्ट व भारतीय संविधानाच्या “विरोधात जाऊ शकत नाही. ही वास्तविकता आहे.त्यामुळे महाराष्ट्र राज्यांमध्ये मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर भारतीय संसद व सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारात राहून हा प्रश्न सोडवता येईल .आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत असल्यामुळे राज्य सरकारला कोणताही अधिकार नाही.

महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण लागू करण्यासाठी मोर्चे काढून किंवा आंदोलन करून याचा कदापिही फायदा मोर्चेकरयांना होणार नाही. यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन देशाच्या पार्लमेंटमध्ये या विषयावर ” विशेष अध्यादेश “काढण्यासाठी पुढाकार घ्यावा व. ” सर्वोच्च न्यायालय आणि संसद ” देशाच्या या दोन स्तंभामध्ये राहूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येईल असे माझे स्पष्ट मत आहे.
…….सन 2004 मध्ये काँग्रेसचे सरकार केंद्रात असताना केंद्र सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाबाबत याबरोबरच सर्वच आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी खासदार .नचीआपण समितीची निर्मिती करण्यात आली होती या समितीने सन 2005 मध्ये आपला अहवाल केंद्र सरकार कडे सादर केला. या अहवालात प्रामुख्याने आरक्षणाची 50% टक्क्यांची मर्यादा हटविण्याची महत्त्वपूर्ण शिफारस संसदेला केली होती. केंद्र सरकारने स्वीकारला तर मराठा समाजाला 16% टक्के आरक्षण मिळू शकते .परंतु यासाठी महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी एकत्र येऊन हा लढा संसद व सर्वोच्च न्यायालयात लढायला पाहिजे आहे.

– राजाभाऊ गडलिंग
( मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ),
अमरावती- महाराष्ट्र. Mobile:-9860442682./
8208954763.

spot_img
spot_img