दहा वर्षापासून केंद्रात भाजप सरकार तर जनता सरकारच्या दबावात : जनतेने लक्षपूर्वक मतदान करावे : समाजसेवक -प्रेम (हितेश) मुंदाफळे
नागपूर : आजच्या घडीला गरिबांची बिकट परिस्थिती चाललेली आहे. जनतेने विचार करावा, महागाई, बेरोजगारी,गरीबाचे शिक्षण महाग झाले आणि शेतकऱ्यांचे काय हाल होत आहे ? हे तुम्ही समजू शकता ! विचार करा ! कोणत्या सरकारला आपल्याला निवडून द्यायचं आहे हे जनतेनेच विचार करावा:
जनतेने आपल्या कुंटुबांचा व सामान्य माणसाचा विचार करून मतदान करावे आणि सरकारला निवडून द्यावे. या सरकारने आपलं कधीच भल केलं नाही, त्या सरकारला मतदान करूच नका ? कारण
या महाराष्ट्र सरकारमध्ये तीन तिघाडा, काम बिघाडा, सरकार आहे. यांनी कधी सामान्य माणसाचं किंवा जनतेचे व गरिबांचे किंवा शेतकऱ्यांचं कधीही भलं केलं नाही. हे फक्त आपलेच खिशे भरतात, याला सरकार म्हणतात ?
हे फक्त सत्तेचे लोभी आहे ? यांना मोठ-मोठे पद पाहिजे ? गोर गरीबाचा कधीही विचार करत नाही म्हणून आपला देश मागे राहिला आहे. भाजपनेच मोठमोठ्या पक्षाची फोडाफाडी केली आहे. हे फक्त राजकारणच करतात ! गरिबाचं कधीच भलं नाही करत, मागील पंचवीस वर्षापासून गरिब युवकांना नोकऱ्या नाहीत. यूवक व युवतीं बेरोजगार पडलेले आहे.गरीब जनतेचे शिक्षण महाग झाले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करतांना थोडा विचार करावा.
केंद्र सरकारमध्ये कोणतं सरकार आलं पाहिजे. आपल्याला न्याय मिळालाच पाहिजे. हे फक्त जनतेने लाच विचार करावा लागेल म्हणून आपल्याचमुळे सरकार उभे होते. आपणच एक सरकार आहे हे लक्षात घ्या ? आपल्याला कोणती सरकार पाहिजे त्यालाच मतदान करा !परंतु निवडणुकीच्या वेळेस ईव्हीएम मशीन असेल तर मतदान करू नका ? बॅलेट पेपर असेल तरच मतदान करा. हे जनेतेनेच लक्षात ठेवा : तरच आपण सुरक्षित राहू अन्यथा आपला भारत देशाला हेच लोक विकून खातील. आणि आज आपण भीक मागू अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ? जर ईव्हीएम बाबत विचार केला तर, एका बॅलेट पेपरवर 16 उमेदवारांची नावे असतात. याप्रमाणे 24 बॅलेटवर 384 उमेदवार समाविष्ट करता येईल.
उमेदवारांची संख्या 384 पेक्षा अधिक झाल्यास निवडणूक आयोगाला मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर बंदी घालून मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात. अशी मागणी राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष व दक्षिण नागपूर विधानसभेचे प्रेम (हितेश) मुंदाफळे यांनी केली आहे.